विमानतळावरील धावपट्ट्यांची लांबी वाढविण्यात येणार असून त्यात कोल्हापूरसह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश (जबलपूर), मेघालय (बारापानी), आंध्र प्रदेश (तिरुपती व काडापा) तसेच तामिळनाडू (तुतीकोरीन) आदी विमानतळांचा समावेश असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई प्राधिकरणाने (Airport Authority of India) देशातील सात विमानतळांच्या (airports) धावपट्ट्यांना (runway) मार्च २०२२ पर्यंत अद्ययावत करून त्यांची लांबी वाढविण्याचा (extension of lenth) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात कोल्हापूरसह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश (जबलपूर), मेघालय (बारापानी), आंध्र प्रदेश (तिरुपती व काडापा) तसेच तामिळनाडू (तुतीकोरीन) आदी विमानतळांचा समावेश असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.
कोल्हापूर येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १३७० मीटर असून ती २३०० मीटरपर्यंत वाढविण्याचे सुरू झाले असून यंदाच्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याची योजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळाची रचना विशेष प्रकाराच्या विमानांचा आकार तसेच विमानांचे ट्रफिक आणि इतर बाबींचा विचार करून केलेली असते. जेव्हा एअर ट्रफिक वाढून विमानांची संख्या वाढते तेव्हा एअरलाईन कंपन्यांना मोठी विमाने त्या विमानतळावरून सुरू करायची असतात. याच कारणांसाठी विमानांच्या धावपट्ट्यांची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठी विमाने उतरविणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे.