कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची नवी नियमावली ; महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या नागरिकांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन

महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मागच्या चोवीस तासांत १६हजार ६२० नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. हा रूग्णांचा आकडा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बाजूचेच राज्य असल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

    भोपाळ: कोरोनाची रुग्णसंख्या देशभरात वाढ आहे.मात्र वाढत्या रुग्णसंख्येची तीव्रता महाराष्ट्रात अधिक असल्याचे दिसून येत आहे. वाढती आकडेवारी लक्ष घेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने नुकतीच नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार ‘ महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. यासोबत सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील नियमावलीत केले आहे. तसेच क्रायसिस मॅनेजमेंट टीम रात्रीच्या संचारबंदी संदर्भात निर्णय घेईल ‘, असे सांगण्यात आले आहे.

    महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मागच्या चोवीस तासांत १६हजार ६२० नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. हा रूग्णांचा आकडा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बाजूचेच राज्य असल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

     रूग्णसंख्येची सद्यस्थिती

    गेल्या २४ तासात नोंदविण्यात आलेल्या २५,३२०) नवीन रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ८७. ७३ टक्के रुग्णांची नोंद झाली.आहे. महाराष्ट्रात१५,६०२ इतक्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यापाठोपाठ केरळमध्ये २,०३५ तर पंजाबमध्ये१,५१० नवीन रुग्णांची नोंद झाली.

    मध्यप्रदेशातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात रविवारी ७४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रूग्णांसोबतच आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ६८हजार ५९४ पर्यंत पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३८८७झाली आहे. मध्यप्रदेशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की,रविवारी राज्यातील कोविड-१९चे २९६ नविन रूग्न इंदौरमध्ये सापडले. तर भोपाळमध्ये १३९ आणि जबलपूरमध्ये ४५ नविन रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील २लाख ६८ हजार ५९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी आतापर्यंत २ लाख ५९ हजार९८७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४७४० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच रविवारी ५१३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.