One and a half kg golden urn containing water of Ganga in Govind Devji temple; 5.73 crore for security

भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांची सुरक्षा देखभाल करण्यासाठी मंदिर समित्या कार्यरत आहेत. मंदिरांच्या सुरक्षेसह इतर कामांसाठी मोठा खर्च केला जातो. अशाच एका मंदिरात 107 वर्षांपासून गंगेचे पवित्र पाणी एका दीड किलोच्या सुवर्ण कलशामध्ये साठवून ठेवले आहे. या कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    जयपूर : भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांची सुरक्षा देखभाल करण्यासाठी मंदिर समित्या कार्यरत आहेत. मंदिरांच्या सुरक्षेसह इतर कामांसाठी मोठा खर्च केला जातो. अशाच एका मंदिरात 107 वर्षांपासून गंगेचे पवित्र पाणी एका दीड किलोच्या सुवर्ण कलशामध्ये साठवून ठेवले आहे. या कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    1 इन्स्पेक्टर व 3 शिपाई तैनात

    गोविंद देवजी मंदिराच्या पाठिमागे देवस्थान विभागाच्या राजकीय प्रत्यक्ष प्रभार श्रेणी मंदिर श्री गंगाजीमध्ये 107 वर्षांपासून 1.50 किलो वजनाच्या सुवर्ण कलशामध्ये पवित्र गंगेचे पाणी ठेवले आहे. या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी 1 इन्स्पेक्टर आणि 3 शिपाई 24 तास तैनात असतात. या कलशाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी 90 लाख खर्च करावे लागत आहेत.

    दागिने व इतर मौल्यवान वस्तू ट्रेजरीमध्ये

    हे मंदिर राजस्थानच्या जयपूर येथील आहे. देवस्थान विभागाने जुलै 2010 ते 31 मार्च 2021 पर्यंत 5.73 कोटी रुपये खर्च केले आहेत. 10 जुलै, 2009 रोजी, सरकारी सहसचिवांच्या आदेशानुसार, देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांनी मंदिरांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ट्रेजरीमध्ये ठेवल्या होत्या. परंतु, भाविकांच्या भावनेचा विचार करता हा सोन्याचा कलश मंदिरातच ठेवला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च होत आहे.

    2021 पर्यंत पोलिस रक्षकांची सुरक्षा कायम

    मात्र, हा कलश स्ट्रॉंग रूममध्ये का ठेवला नाही, असे प्रश्न ऑडिटमधून उपस्थित केले गेले. देयकाच्या बिलांबरोबरच गार्डचे हजेरी प्रमाणपत्रही दिले गेले नाही, असे त्यांनी म्हटले. ऑगस्ट 2020 मध्ये आयुक्त देवस्थान विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी परवानगी मागितली तेव्हा तत्कालीन सहसचिव अजयसिंह राठोड यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिस सुरक्षेची मागील विधेयक मंजूर करताना 31 मार्च 2021 पर्यंत पोलिस रक्षकांची सुरक्षा कायम ठेवण्यास परवानगी दिली.

    हे सुद्धा वाचा