पाकिस्तान, भुयारे आणि ड्रोनद्वारे पाठवतो ड्रग्स आणि हत्यारे- Lt. जनरल बीएस राजू यांचा खुलासा

काश्मीरच्या खोऱ्यात (Kashmir valley) पाकिस्तान (Pakistan) हरप्रकारे दहशतवाद (terrorism) आणि घुसखोरीला (infiltration) प्रोत्साहन (encouragement) देतो ही गोष्ट काही लपलेली नाही. मात्र सुरक्षादलांच्या (armed forces) सतर्कतेमुळे (awareness) पाकिस्तानची प्रत्येक खेळी अयशस्वी (unsuccessful) होते. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की खोऱ्यात आता सक्रीय दहशतवाद्यांची (active terrorists) संख्या फक्त 217 राहिली आहे जो गेल्या एक शतकातला नीचांक (lowest in decade) आहे.

जम्मू (Jammu).  काश्मीरच्या खोऱ्यात पाकिस्तान (Pakistan) हरप्रकारे दहशतवाद आणि घुसखोरीला प्रोत्साहन देतो ही गोष्ट काही लपलेली नाही. मात्र सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानची प्रत्येक खेळी अयशस्वी होते. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की खोऱ्यात आता सक्रीय दहशतवाद्यांची संख्या फक्त २१७ राहिली आहे जो गेल्या एक शतकातला नीचांक आहे.

वेगवेगळ्या मार्गांनी दहशतवादाला प्रोत्साहन देतो पाकिस्तान
पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतो. हत्यारे आणि ड्रग्सचा पुरवठाही तिथून केला जातो आणि यासाठी ड्रोन आणि भुयारांचा वापरही केला जातो. नुकताच सुरक्षादलांनी अशा भुयारांचा तपास लावला आहे ज्या नियंत्रण रेषेपर्यंत जातात. सुरक्षादलांनी सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या मदतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या ड्रोन्सनाही निशाणा करत खाली पाडले आहे.

खोऱ्यात आता फक्त २१७ दहशतवादी
काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या अस्तित्वाबद्दल चिनार कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी म्हटले आहे, ‘2020मध्ये दहशतवाद्यांची भरती नियंत्रणात राहिली आहे, खासकरून 2018च्या तुलनेत. सध्या खोऱ्यात सक्रीय असलेल्या आतंकवाद्यांची संख्या फक्त 217 आहे जो गेल्या एक दशकात सर्वात कमी आहे.’ त्यांनी सांगितले की ड्रोन्स आणि भुयारांच्या माध्यमातून आतंकवाद्यांना हत्यारे आणि ड्रग्स पोहोचवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यासाठी ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार्सचा वापर होत आहे ज्यामुळे या भुयारांचा पत्ता लागतो.

दहशतवाद्यांना दिला जातो आत्मसमर्पणाची संधी
— ते म्हणाले, ‘आम्हाला जेव्हा कळते की कोणत्याही ठिकाणी दहशतवादी सुरक्षादलाच्या जवानांनी घेरले गेले आहेत, तेव्हा आम्ही आधी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगतो, खासकरून जर ते स्थानिक नागरिक असतील तर. जर त्यांची ओळख पटली तर आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून घेतो. जेव्हा सर्व प्रयत्न असफल होतात तेव्हाच आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करतो आणि त्यांना ठार करतो.’