कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांची कर्नाटक सीमेवर प्रवेशबंदी केली जात आहे. प्रवेशासाठी कर्नाटक सरकारने काही अटी घातल्या आहेत.
कर्नाटक : कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांची कर्नाटक सीमेवर प्रवेशबंदी केली जात आहे. प्रवेशासाठी कर्नाटक सरकारने काही अटी घातल्या आहेत.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारची प्रवेशबंदी लागू केली आहे. ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह आवाज जवळ असेल तरच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात आहे.
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून कडक तपासणी केली जात आहे. निगेटीव्ह अहवाल जवळ नसणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवले जात आहे. अचानक सुरु झालेल्या तपासणीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.