आसामच्या गोलाघाट(Golaghat)जिल्ह्याच्या बोकाखाट (Bokakhat)भागात २५०० शिंगं जाळण्यात आली आहेत. काझीरंगा अभयारणं(kaziranga National Park) आणि व्याघ्रप्रकल्पापासून नजीकच हे सर्व करण्यात आलं आहे. याबाबतचं कारण आसाम सरकारनं (Assam Government )जाहीर केलं, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
आज २२ सप्टेंबर, म्हणजेच वर्ल्ड ऱ्हायनो डे(World Rhino Day 2021) अर्थात जागतिक गेंडा दिवस आहे. अशा दिवशी संबंधित व्यक्ती, घटना किंवा प्राणीमात्राविषयी आदर, सन्मान किंवा आठवण काढली जाते. पण आसाम सरकारने(Assam) आजच्याच दिवशी २५०० गेंड्याची शिंगं जाळून(2500 Horns Burnt By Assam Government) टाकली आहेत.
आसामच्या गोलाघाट(Golaghat)जिल्ह्याच्या बोकाखाट (Bokakhat)भागात २५०० शिंगं जाळण्यात आली आहेत. काझीरंगा अभयारणं(kaziranga National Park) आणि व्याघ्रप्रकल्पापासून जवळ हा सगळा प्रकार करण्यात आला. याबाबतचं कारण आसाम सरकारनं (Assam Government )जाहीर केलं आहे. ते ऐकून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळण्यात आली आहेत. तर ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा(Himanta Biswa Sarma) यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
Today is a historic day for Assam & India. We have taken an extraordinary step of burning stockpile of 2479 horns of single-horned Rhinos, first-of-its-kind globally in volume terms, pursuing vision of Hon PM Sri @narendramodi of putting an end to poaching in Assam 1/2@PMOIndia pic.twitter.com/4SuN0XuCWB
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 22, 2021
हिमंता बिस्व शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेंड्यांची शिंगं औषधी म्हणून वापरण्याचा एक समज आहे. पण ते खरं नसून फक्त दंतकथा आहे. एकशिंगी गेंडे हे फक्त आपल्या जैवविविधतेचा एक घटक नसून ते आपल्या वारशाचं एक प्रतिक आहे”. गेंड्यांच्या शिंगांबद्दल असलेल्या याच चुकीच्या समजाला खोडून काढण्यासाठी ही शिंगं जाळण्यात आल्याचं आसाम सरकारकडून सांगण्यात आलं आहे.