हरतालिका विशेषहरतालिका व्रत करत असाल तर चुकूनही करु नका ह्या गोष्टी
1/5
या गोष्टी ठेवा लक्षात : हरतालिका व्रत अत्यंत महत्त्वाचे असते. या उपोषणासंदर्भात काही वशेष नियमांचे पालन करावे लागते. ह्या व्रताच्या दिवशी महिला निर्जला उपवास करतात आणि आपल्या पतिच्या दिर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करतात. परंतु काही महिलांकडून उपासादरम्यान चुका होतात. ह्या व्रतामध्ये काही चुका लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आम्ही आपल्याला काही गोष्टी सांगत आहोत. ज्या आपण लक्षात ठेवाव्यात.
2/5
उपवासादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा : उपवास करणाऱ्या महिलांना आपल्या रागावर संयम ठेवण्याची गरज आहे. काहीही झाले तरी आपल्या रागावर नियंत्रण राहिले पाहिजे. अजिबात रागवायचे नाही आहे. असे मानले जाते की उपवास करणाऱ्या महिलांनी रागावू नये. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही कारणे आहेत. उपवासात शरीर कमकुवत होते. म्हणून रागामुळे आपल्या शारिरीक समस्या निर्माण होऊ शकते.
3/5
रात्री झोपू नये : असे मानले जाते की व्रत धारण केलेल्या महिलांनी झोपू नये. उपवासात झोपणे व्रतात बरोबर मानले जात नाही. म्हणून शेजारील महिला एकत्र मिळून भजन किंवा कीर्तन करतात.
4/5
ह्या गोष्टी अजिबात विसरु नका : व्रतामध्ये आपण नेहमी वडिलधाऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांचा आदर केला पाहिजे. व्रत असताना लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी अपशब्द बोलू नये याची विशेष काळजी घ्यायची असते.
5/5
चुकूनही करु नका या करु नका या गोष्टीचे सेवन : हरतालिका व्रताचा उपवास निर्जला ठेवण्यात येतो. त्यामुळे जर एखादी महिला दुध सेवन करत असेल तर पुराणात असे सांगितले आहे की पुढच्या जन्मी ती सर्पाच्या योनीमध्ये जन्माला येते. तसेच जर महिला पाणी पित असेल तर पुढच्या जन्मात तिला माशाचा जन्म प्राप्त होतो.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.