गट ‘ब’ आणि गट ‘क’ च्या पदांसाठी परीक्षांचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्यता ; मात्र या मुद्द्यांचा करावा लागेल विचार

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क मधील पदासांठीच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे. गट ब आणि गट क च्या परीक्षा घेण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी देखील आयोगाले राज्य सरकारला कळवले आहे.

    पुणे: राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तयारी दर्शवली आहे. मात्र त्यापूर्वी लोकसेवा आयोगाने राज्य सरकारपुढे या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत. त्यानुसार प्रमुख बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सूट) विनियम १९६५ मध्ये आवश्यक ते बदल करणे. सर्व शासकीय विभागांच्या सर्व संवर्गांचे सेवा प्रवेश नियम आयोगाच्या सहमतीने सुधारित करणे, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ वाढवणे, यासह इतर अटींवर लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार असल्याचे सरकारला कळवण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाचा संविधान निर्मित्त दर्जा लक्षात घेता एमपीएससीने गट ड मधीलपदे भरण्यास मान्यता दिलेली नाही.

    राज्य सरकारने पत्र लिहून एमपीएससीला गट ब, गट क आणि ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्याबाबत अभिप्राय मागवला होता. यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांची भूमिका सरकारला कळवली आहे. त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहाने लागणार आहे. महापोर्टल म्हणजेच महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात, अशी मागणी हजारो विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. त्यानुसार लोकसेवा आयोगाने राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे.

    राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचे आयोजन करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तयारी दर्शवली आहे. याबाबत लोकसेवा आयोगाने राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क मधील पदासांठीच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे. गट ब आणि गट क च्या परीक्षा घेण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी देखील आयोगाले राज्य सरकारला कळवले आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती परीक्षा घेतल्यास त्यामध्ये पारदर्शकता राहणार आहे. विद्यार्थ्यांनी याविषयी राज्य सरकारकडे मागणी केली होती. लोकसेवा आयोगानं परीक्षा घेतल्यास सगळ्याच भरतीप्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.