सोमवारी दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच मराठवाडा व विदर्भात मागील तीन दिवस गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय सोमवारी दुपारनंतर पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागात ढगाळ होते.
राज्यात दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचे सावट असणार असल्याचे सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिसावला आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी आणखी दोन दिवस पावसाचे सावट असणार आहे. पुढील दोन दिवसांत चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
IMD GFS model guidance for 23 Mar indicates continuing of similar weather, TS ??with gusty winds & light to mod rains with possibility of hailstorms at isolated places in interior of Maharashtra. @RMC_Mumbai@RMC_Nagpur have already issued weather warnings. Pl watch updates. pic.twitter.com/6vjYSpjGDI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 22, 2021
सोमवारी दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच मराठवाडा व विदर्भात मागील तीन दिवस गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय सोमवारी दुपारनंतर पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागात ढगाळ होते.
दरम्यान, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय गुरुवारपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.