माळेगाव खुर्द(ता बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन
संस्थेच्या चर्चासत्रामध्ये बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
माळेगाव खुर्द(ता बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या चर्चासत्रामध्ये बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

बारामती: पंजाबमधील गहू आणि तांदळाच्या दर, विक्री व विपणन व्यवस्थेबाबत तेथील प्रश्न मोठे आहे. सध्याचे दिल्लीचे शेतकरी आंदोलन देखील या प्रश्नांमुळे सुरू आहे,आपण कृषिमंत्री असताना पंजाबच्या शेतक-यांना गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करून त्याठिकाणी डाळी व फळबाग लागवडी वाढवण्यासाठी आवाहन केले होते. मात्र त्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताहास सुरुवात झाली.

बारामती: पंजाबमधील गहू आणि तांदळाच्या दर, विक्री व विपणन व्यवस्थेबाबत तेथील प्रश्न मोठे आहे. सध्याचे दिल्लीचे शेतकरी आंदोलन देखील या प्रश्नांमुळे सुरू आहे,आपण कृषिमंत्री असताना पंजाबच्या शेतक-यांना गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करून त्याठिकाणी डाळी व फळबाग लागवडी वाढवण्यासाठी आवाहन केले होते. मात्र त्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि
तंत्रज्ञान सप्ताहास सुरुवात झाली.दि १८ ते २४ जानेवारी दरम्यान हा सप्ताह पार पडणार आहे. त्याअंतर्गत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यावस्थापन संस्थेमध्ये आयोजित दुष्काळ निवारण यंत्रणा या चर्चासत्रामध्ये पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,कृषी मंत्री दादा भुसे,खा.सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,राज्यमंत्री शंकरराव गडाख,राज्यमंत्री विश्वजीत कदम ,आ.रोहित पवार ,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह कृषी सचिव,कृषी विद्यापीठाचे कुलगुरु,राज्यातील अनेक भागातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले,देशातील शेतक-यांना जगाच्या तुलनेत आधुनिक शेती तयार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे बहुमुल्य योगदान असून यामुळे शेती उद्योगास जागतिक दर्जा मिळाला आहे. कृषि क्षेत्राबाबत विविध राष्ट्रीय संशोधन संस्था मोलाची कामगिरी पार पाडीत आहेत. मात्र या संस्थांना प्रादेशिक स्थितीबाबतची माहिती कमी आहे.त्यामुळे शेतक-यांना त्याचा फायदा होत नाही.शेती ही समृद्ध बनली पाहिजे.शेती व्यवसायापुढे अनेक आव्हाने आहेत. पुढील काळात पाणी संकट उभा राहणार आहे.या संकटाचा सामना केला पाहिजे.कमी पाणी लागणारे पिक घ्यावे लागणार आहे.पारंपरिक पिके सोडून भरड धान्याकडे वळले पाहिजे.शेतक-यांना दोन पैसै जादा मिळणारी पिके घेतली पाहिजेत.

तर यावेळी कृषि राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर शेतक-यांना सोयी सुविधा पुढील काही कालावधीतउपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा शेतमाल स्वत:
विकू शकेल. वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून उत्पादन वाढवणा-या राज्यातील ५ हजारशेतक-यांना एकत्रित करून शासनाने रिसोर्स बँक स्थापन केली आहे.त्यामाध्यमातून वेगवेगळ््या प्रयोगांचा आणि संशोधनाचा शेतक-यांना भविष्यात फायदा होणार आहे. दरम्यान भारतिय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी व्हिडीओ काॅलिंगद्वारे संवाद साधला. व प्रस्ताविक संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील, मृदा व जलसंवर्धन मंत्री शंकरराव गडाख, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.