अरबी समुद्रासह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे खूपच कमी ठिकाणी आज सूर्य दर्शन झालं आहे. शिवाय वातावरणात गारवा वाढला आहे.
पुणे: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात येत आहे. पण त्याठिकाणी अपेक्षित सरी कोसळत नाहीत. आज हवामान खात्यानं दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रासह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे खूपच कमी ठिकाणी आज सूर्य दर्शन झालं आहे. शिवाय वातावरणात गारवा वाढला आहे. पुढील तीन ते चार तासांत रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे.
Latest satellite imageries are indicating possibility of moderate rain with occasional intense spells of rainfall very likely in the districts of Raigad, Ratnagiri,Satara, Pune , Ahmednagar, Sholapur, Beed, Latur, Aurangabad and Jalna during next 3-4 hrs pic.twitter.com/C5ANPV2HEt
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 30, 2021
या व्यतिरिक्त आज मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केली केला आहे.