
माळशिरस: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झालेला असताना बहुतांश ग्रामपंचायतीत गाव गाव पुढाऱ्यांना अशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले असल्याचा प्रकार घडताना दिसत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीचे बिगुल वाजलेले असताना प्रत्येक गावात गावपुढार्यांना आपल्याच हाती सत्ता असावी असा चंग बांधलेला आहे. तसेच आपल्या गावात ज़र एखादा सुशिक्षित उमेदवार ज़र सरपंच,उपसरपंच किंवा सदस्य न व्हावा या आकसेपोटी गावपुढार्यांनी आपले ऐकणारा आपल्यापुढे झुकणार्या अशिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्याचा घाट घातला आहे. गावचा विकास व गावची प्रतिमा ह्या गावपुढार्यांना कधी वाढवायची असते का? हे गावातील नागरिकांना कधी कळलेच नाही. परंतु गावपुढार्यांच्या दबावाखाली बरेचशे मतदारही ह्या गोष्टींना कधी विरोध करत नाहीत पण ज़र गावच्या ग्रामपंचायतीत अशिक्षित उमेदवार निवडुण आले तर गावचा विकास व्हायचा लांबच राहिला पण गावपुढारीच गावचे मालक होतील असे मत प्रत्येक गावातील मतदारांचे आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.