२६/११ च्या मध्यरात्री एक्सप्रेस वे जोरदार आवाजाने हादरला,  मध्यरात्री ऐकू येत होत्या किंकाळ्या आणि विव्हळण्याचे आवाज

आज (गुरुवारी) पहाटे २ वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची एसटी बस साताऱ्याकडून मुंबईकडे एक्सप्रेस वे वरून निघाली होती. ती पनवेलकडे जाणाऱ्या बाह्य वळणाजवळ आली असताना अज्ञात वाहनाला ती घासली गेली. त्यामुळे अक्षरशः बसच्या एका बाजूच्या चिंधड्या उडाल्या. त्या बाजूला बसलेले आणि झोपेत असलेले जवळपास सर्वच प्रवासी त्यामुळे गंभीर जखमी झाले.

खोपोली : २६ नोव्हेंबर हा दिवस सर्वांच्या मनात दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनिमित्ताने आजही ताजी आहे त्याच स्वरूपाचे तांडव एक्सप्रेस वे वर घडले. हा दहशतवादी हल्ला नव्हता तर वाहनचालकांच्या चुकीमुळे ही गंभीर घटना घडली.

आज (गुरुवारी) पहाटे २ वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची एसटी बस साताऱ्याकडून मुंबईकडे एक्सप्रेस वे वरून निघाली होती. ती पनवेलकडे जाणाऱ्या बाह्य वळणाजवळ आली असताना अज्ञात वाहनाला ती घासली गेली. त्यामुळे अक्षरशः बसच्या एका बाजूच्या चिंधड्या उडाल्या. त्या बाजूला बसलेले आणि झोपेत असलेले जवळपास सर्वच प्रवासी त्यामुळे गंभीर जखमी झाले.

एसटीच्या या अपघातात एक जण ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना पनवेल हद्दीत आली असताना पनवेल बाजूकडे टर्न घेताना अपघात झाला. त्यात बसमधील एक जण ठार झाला असून १५ जण जखमी झाले आहेत, जखमींना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्ती बेस्ट ड्रायव्हर होती, अशी माहिती कळते आहे.

या धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच असलेल्या देवदूत यंत्रणेच्या तळावरून सगळे जवान त्या ठिकाणी धावले. हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीसांच्या पळस्पे टॅपचे कर्मचारी देखील काही क्षणात मदतीला आले. आय. आर. बी. पेट्रोलिंग,  डेल्टा फोर्स आणि लोकमान्य हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स सेवा त्वरित उपलब्ध झाली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना रात्रीच्या अंधारात फक्त किंकाळ्या आणि विव्हळणे ऐकू येत होते.

सगळ्या यंत्रणांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून जखमींना तातडीने MGM हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले,  त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असली तरी  मृत्यूचे भय अजून घोंगावत आहे,  आरोग्य यंत्रणा योग्य उपचार करत आहे. धडकेत एका प्रवाशाला मृत्यूने गाठले आहे आणि इतरांच्या जखमाही गंभीर स्वरूपाच्या आहेत.