‘या’ पानावर लिहा तुमच्या मनातील इच्छा; येतील चमत्कारिक अनुभव!

समस्या कुठल्याही प्रकारच्या असतील.या समस्या माणसा संदर्भात असतील, वास्तू संदर्भात असतील, नोकरीधंदा संदर्भातील असतील, प्रेमसंबंधातील असतील अशा अनेक वेगवेगळ्या समस्या असू शकतात. या सर्व समस्या संपावेत अथवा या सर्वात आपली काही अडलेली कामे असतील ती मनासारखे पूर्ण होण्यासाठीची इच्छा असेल अशा अनेक इच्छा पूर्ण होण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

    मित्रांनो आपल्या सर्वांना कधीतरी असे वाटत असेल की असा काहीतरी चमत्कार व्हावा आणि माझ्याकडे भरपूर पैसे यावेत. भरपूर संपत्ती यावी, मला एखादी लॉटरी लागावी. इथपासून ते माझ्या बँकेच्या अकाउंट वर कुठून तरी जादा रक्‍कम येऊन पडावी. अथवा जर कोणतीही समस्या असेल तर कधी एकदा आपणाला सुरू असलेली ही समस्या सुटेल असे वाटत असते. या समस्या कुठल्याही प्रकारच्या असतील.या समस्या माणसा संदर्भात असतील, वास्तू संदर्भात असतील, नोकरीधंदा संदर्भातील असतील, प्रेमसंबंधातील असतील अशा अनेक वेगवेगळ्या समस्या असू शकतात. या सर्व समस्या संपावेत अथवा या सर्वात आपली काही अडलेली कामे असतील ती मनासारखे पूर्ण होण्यासाठीची इच्छा असेल अशा अनेक इच्छा पूर्ण होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही एक सोपा उपाय येथे सांगत आहोत. या उपायाने आपल्या सर्व समस्या तात्काळ संपतील. तसेच आपल्या इच्छा एक दोन दिवसातच पूर्ण होतील.

    सोपा उपाय 

    तुम्हाला तेजपत्ता माहिती असेल. या तेज पत्ताचा वापर आपण नेहमी मसाल्यासाठी करतो. पण आपणाला हे माहित नाही की या तेजपत्ताचा वापर एका अशा विशिष्ट पद्धतीने केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. वेगवेगळ्या समस्या सुटतात. मार्ग सापडतो. मित्रांनो या उपायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे यासाठी आपली प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. हीच शक्‍ती म्हणजेच हाच विचार असा भक्‍कम ठेवायला पाहिजे की मी जे है करत आहे यामुळे माझे सर्व काम पूर्ण होणार आहे माझ्या समस्या सुटणार आहेत. या उपायासाठी आपणाला लागणार आहे एक तेज पत्ती. यानंतर तुम्हाला जी काही समस्या असेल तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारी असतील, पैशाविषयी अडचणी असतील, प्रेमात सफलता मिळवायची असेल, संततीप्राप्तीसाठी अडचण असेल, घरातील ज्येष्ठांचा आजारपण असेल, नोकरी मिळत नसेल, मिळालेल्या नोकरीत कटकटी असतील, नोकरीत बढती हवे असेल, व्यापारात वृद्धी होत नसेल याचबरोबर अनेक विविध प्रकारच्या समस्या असू शकतात त्या तुम्ही या तेज पत्त्यावर लिहायच्या आहेत. लिहिताना पेन पेन्सिल याचा वापर केला तरी चालेल. मित्रांनो आपणाला ही शंका वाटेल की त्या छोट्याशा पत्त्यावर ती पूर्ण समस्या कशी लिहायची? तर त्या समस्येविषयी एकच शब्द लिहून त्याच्याखाली तुमचे नाव लिहावे. समजा तुम्हाला पैशाची अडचण असेल तर तुम्ही त्या पत्त्यावर पैसे किंवा रुपये असे लिहावे अथवा नाण्याचे चिन्ह काढावे आणि त्याच्या खाली तुमचे नाव लिहावे. अशाच पद्धतीने दुसऱ्या समस्यांसाठी आपण संक्षिप्त रुपात लिहू शकता.

    कोठे करायचा उपाय?

    हा उपाय करण्यासाठी एका विशिष्ट वेळीची गरज आहे. ती वेळ म्हणजे जेव्हा आपणाला आकाशामध्ये संपूर्ण चंद्र दिसतो त्यावेळी हा उपाय करावयाचा आहे. म्हणजेच पौर्णिमेदिवशी हा उपाय करावयाचा आहे. पौर्णिमेदिवशी पूर्ण चंद्र दिसत असताना आपल्या हातामध्ये आपली इच्छा लिहिलेले पान घ्यायचे आहे आणि त्याच्यावर दुसरा हात ठेवायचा आहे म्हणजेच नमस्कार प्रमाणे हात जोडून त्या हातामध्ये ते पान ठेवायचे आहे आणि त्यावेळी मनोभावे आपली इच्छा संपूर्ण सकारात्मक विचाराने मनातल्यामनात बोलून दाखवायचे आहे. यावेळी आपण कुठल्याही भगवंताचे नाव नामस्मरण करावं. खास करून आपल्या कुलदैवताची आराधना करावी. साधारणपणे ही कृती चार ते पाच मिनिटांसाठी करावी. यानंतर है पान जाळून टाकावे.

    कुठे व कसे जाळावे पान?

    मित्रांनो हे पान तुम्ही मेणबत्तीच्या साह्याने अथवा गॅसवर जाळले तरी चालेल. कुठेही जाळल्यानंतर त्या पानाची जी राख तयार होईल ती राख आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घराच्या छतावर वर अथवा जिथपर्यंत जाणं शक्‍य आहे तिथे जाऊन आपल्या हातातील राख फुंकर मारून फुकून दयायचे आहे, आणि यावेळी अशी भावना आपल्या मनात ठेवायचे आहे की माझे काम आता पूर्ण झाले माझी इच्छा पूर्ण झाली किंवा माझी समस्या सुटली. मित्रांनो या उपायाने नंतर आपण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे आणि सर्व गोष्टी या सकारात्मक दृष्टीने करत गेल्या पाहिजेत. आपणाला नक्कीच एक ते दोन दिवसात हा उपाय केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होताना किंवा समस्या सुटताना दिसून येतील.

    (धार्मिक मान्यतेच्या आधारावर वरील माहिती देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही.)