माळशिरसमध्ये राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. माळशिरसच्या चारही ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा फडकला आहे.
सोलापूर : माळशिरसमध्ये राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. माळशिरसच्या चारही ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा फडकला आहे. येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या आहेत.
येळीव , विजयवाडी , खळवे , विठ्ठलवाडी या ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते पाटील गटाने जिंकल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकां पैकी चार बिनविरोध झाल्या, म्हाळुंग ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली, यामुळे ४४ जागांसाठी निवडणूक लागली.
अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती आहे सत्ता. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आव्हान दिले आहे. इथल्या 17 जागांपैकी एका जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे.