सोलापूर – भोगावती – निळकंठा नदीला पूर आल्याने बार्शी तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला..

सततच्या पावसामुळे भोगावती - निळकंठा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली आहे. यामुळे परिसरातील बावी, मळेगाव,उपळे, गौडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.

    सोलापूर जिल्ह्यातील पावसाने कांही दिवस विश्रांती घेतली होती, मात्र मागच्या चार दिवसांपासून बार्शी तालुक्यात पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरु केलीय. त्यामुळे तालुक्यातील हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव धरण पूर्णतः भरलेला आहे.

    सततच्या पावसामुळे भोगावती – निळकंठा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली आहे. यामुळे परिसरातील बावी, मळेगाव,उपळे, गौडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.