इंग्लंडने जिंकला टॉस, फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय ; टीम इंडियाची बॅटींग सुरू

टीम इंडियाने आज कुलदीप यादवला डच्चू देत टी नटराजनला अंतिम सामन्यात संधी दिलीय. तर सलग तीन वेळा इंग्लंडने प्रथम टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया बॅटिंग करणार असून सलामीवीर जोडी मैदानात उतरली आहे. 

    पुणे : टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय ((India vs England 3rd ODI)) सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाने आज कुलदीप यादवला डच्चू देत टी नटराजनला अंतिम सामन्यात संधी दिलीय. तर सलग तीन वेळा इंग्लंडने प्रथम टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया बॅटिंग करणार असून सलामीवीर जोडी मैदानात उतरली आहे.

    दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आजचा अंतिम सामना जिंकून सिरीज जिंकण्याचा दोन्ही संघांनी निर्धार केला आहे.पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक यश मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडिया विजयाची सलामी ठोकणार का,हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.