नेमबाजी विश्वचषकात महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश, तिन्ही पदकं भारतालाच

२३वर्षीय चिंकीच्या सुवर्णपदकामुळे भारताकडे आता एकूण ९ सुवर्णपदके झाली आहेत. नेमबाजीच्या या प्रकारात १९ वर्षीय राहीला रौप्य तर, मनू भाकेरला कांस्यपदक मिळाले आहे. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात युवा नेमबाजपटू ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने ५० मीटर रायफल ३पोजिशन इवेंट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.

    नवी दिल्ली : आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. या स्पर्धेतील २५ मीटर पिस्तुल प्रकारातील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. यात भोपाळच्या चिंकी यादवने राही सरनोबत आणि मनू भाकेरला धक्का देत सुवर्णपदकावर नाव कोरले.

    २३वर्षीय चिंकीच्या सुवर्णपदकामुळे भारताकडे आता एकूण ९ सुवर्णपदके झाली आहेत. नेमबाजीच्या या प्रकारात १९ वर्षीय राहीला रौप्य तर, मनू भाकेरला कांस्यपदक मिळाले आहे. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात युवा नेमबाजपटू ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने ५० मीटर रायफल ३पोजिशन इवेंट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.

    भोपाळच्या ऐश्वर्यने ४६२.५ शॉट्ससह प्रथम क्रमांक मिळविला. संजीव राजपूत आणि नीरज कुमार या भारतीय नेमबाजपटुंना सहाव्या आणि आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.