क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हटले. यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विटही केलंय.
पीएम मोदींनी आज सकाळी मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनबद्दल भाष्य करताना २६ जानेवारी मध्ये झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख व्यक्त केले. परंतु याचसोबतच क्रिकेट विश्वातून आलेल्या गुडन्यूजचेही देखील त्यांनी स्वागत करत देशाला आनंद मिळवून दिल्याचे मोदींनी सांगितले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हटले. यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विटही केलंय.
— Virat Kohli (@imVkohli) January 31, 2021
विराट कोहलीच्या घरी गोड कन्येचं स्वागत झालं, त्यासाठी विराट दुसऱ्या कसोटीपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारत लक्षणीय कामगिरी बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या या कामगिरीचं कौतुक केलंय. यासंदर्भातील मोदींचे ते ट्विट विराट कोहलीने रिट्वीटही केलं आहे.