टीम इंडियाचा ICCकडून गौरव; ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘तीं’ मालिका सर्वोत्तम

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात मागील वर्षी पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची आयसीसीने ‘अल्टीमेट टेस्ट सीरिज’ म्हणून निवड केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने ही घोषणा केली. नव्या दमाच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली.

    दुबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात मागील वर्षी पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची आयसीसीने ‘अल्टीमेट टेस्ट सीरिज’ म्हणून निवड केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने ही घोषणा केली. नव्या दमाच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली.

    आयसीसीच्या म्हणण्यानुसार, या पुरस्कारासाठी 15 कसोटी मालिका शर्यतीत होत्या. त्यापैकी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिकेला सर्वाधिक मते मिळाली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कसोटी मालिका भारतासाठी खूप खास होती. टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

    या सामन्यातील एका डावात टीम इंडिया 36 धावांवर बाद झाली. शिवाय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या कसोटीनंतर मायदेशी परतला होता.यानंतर निम्म्याहून अधिक खेळाडू दुखापतींना सामोरे गेले. नव्या आणि युवा खेळाडूंना बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर मैदानात उतरावे लागले. ब्रिस्बेनमधील शेवटचा कसोटी सामना खूप महत्वाचा होता, जेथे भारतीय संघाने बर्‍याच वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. अनेक दशके कांगारू संघाने येथे पराभव पाहिला नव्हता, परंतु टीम इंडियाने सामना जिंकून मालिका 2-1 अशी ताब्यात घेतली.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि पंचांची नावे जाहीर केली आहेत. या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील. तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ मैदानावरील पंच असतील. रिचर्ड केटलबरो हे टीव्ही पंच असतील, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान साऊथम्प्टन येथे अंतिम सामना रंगणार आहे.

    हे सुद्धा वाचा