
कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आंनदाची बातमी आहे. 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत 7 गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-19 विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.
7 गडी राखून धूळ चारली
कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला 68 धावांवर सर्वबाद केले.
सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात 46 धावांची भागीदारी
इंग्लंडने ठेवलेल्या केवळ 69 धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली मात्र 16 धावांवर कर्णधार शफाली वर्माला 15 हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात 46 धावांची भागीदारी झाली. मात्र 24 करून त्रिशा बाद झाली. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर अवघे 69 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर त्यांनी लिबर्टी हीपच्या स्वरुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स हिला देखील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे अवघड झाले तिने केवळ 4 धावा केल्या. पहिल्या 10 षटकात केवळ 39 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता.