
जसप्रीत बुमराहने अतिशय सोपा झेल सोडल्यानंतर विराट कोहलीसह स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या चेहऱ्याचाही रंग उडाला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड : सध्या भारताचा न्यूझीलंड सोबत सामना सुरु आहे भारताच्या संघाने पहिल्या १० ओव्हरमध्ये दमदार कामगिरी केली आहे. परंतु त्यानंतर भारताचा संघ डगमगला. विश्वचषकाला सुरुवात झाल्यानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय भारताच्या फिल्डिंगचेही कौतुक होत होते. पण न्यूझीलंडविरोधात भारताकडून अतिशय खराब फिल्डिंग झाली. अर्धशतकी फलंदाजी करणाऱ्या रचित रवींद्र याला दोन वेळा जीवनदान मिळाले. तर डॅरेल मिचेल याचाही एक झेल सोडला गेला.
जसप्रीत बुमराहने अतिशय सोपा झेल सोडल्यानंतर विराट कोहलीसह स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या चेहऱ्याचाही रंग उडाला. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत भारताची फिल्डिंग सर्वात चांगली होती. भारताच्या फिल्डिंगची अॅक्युरेसी ९१ टक्के होती. एकेरी दुहेरी धावसंख्याही घेणं कठीण होते, पण आजच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी निराश केले. रविंद्र जाडेजाला फिल्डिंगसाठी ओळखलं जाते. मागील सामन्यात त्याने अप्रतिम झेल घेतला होता. पण न्यूझीलंडविरोधात त्याने अतिशय सोपा झेल सोडला. रचित रविंद्र याने भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली. केएल राहुल याच्याकडूनही रचित रविंद्र याला जीवनदान मिळाले.
गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत फिल्डिंगमुळेही सामना जिंकता येतो, हे अनेकदा सिद्ध झालेय, पण आज भारताने अतिशय खराब फिल्डिंग केली, त्याचाच फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. अवघ्या १९ धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज माघीर परतले होते, त्यानंर रचित रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला. झेल सोडत त्यांना भारताच्या खेळाडूंनी मदत केली.