भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी २० विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जात आहे. या सामन्यात क्रिकेटचा किंग अशी ओळख असणाऱ्या भारतीय फलंदाज विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषकात विराट कोहली चांगल्या फॉर्मात असून तो भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करीत आहे.