थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली अशी बातचीत

थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली अशी बातचीत

    नवी दिल्ली : थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फोनवर संवाद साधला. पंतप्रधानांनी संघाचे अभिनंदन केले आणि म्हटले की, क्रीडा विश्लेषकांना हा भारताचा सर्वोत्तम क्रीडा विजय मानावा लागेल. ते म्हणाले की, संघाने एकही फेरी गमावली नाही याचा मला विशेष आनंद आहे.

    पंतप्रधानांनी खेळाडूंना विचारले की, ते कोणत्या स्तरावर जिंकतील असे त्यांना वाटते, किदाम्बी श्रीकांतने त्यांना सांगितले की उपांत्यपूर्व फेरीनंतर, संघाचा शेवटपर्यंत पाहण्याचा संकल्प अधिक दृढ झाला. त्याने पंतप्रधानांना सांगितले की सांघिक भावनेने मदत केली आणि प्रत्येक खेळाडूने आपले 100 टक्के दिले.