भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणं कठीण, सौरव गांगुलीची खळबळजनक प्रतिक्रिया…

रविवार म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. परंतु या सामन्यासंदर्भात देशात सध्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असताना हा सामना होऊ नये, अशी देखील प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान,हा सामना भारतात आयोजित करणं फार कठीण काम असल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिली आहे.

    टी-२० वर्ल्डकपच्या सामन्याला २४ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपचं नियोजन सुरू झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानातील दोन्ही चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. रविवार म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. परंतु या सामन्यासंदर्भात देशात सध्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असताना हा सामना होऊ नये, अशी देखील प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान,हा सामना भारतात आयोजित करणं फार कठीण काम असल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिली आहे.

    काय म्हणाला सौरव गांगुली…

    भारत-पाकिस्तान सामन्याने वर्ल्डकपची सुरुवात काही पहिल्यांदाच होत नाहीये. २०१५मध्ये देखील आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने सुरुवात केली होती. कदाचित २०१९मध्ये ते शक्य होऊ शकलं नाही, पण चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात आणि अंतिम सामना पुन्हा पाकिस्तानसोबतच झाला. असं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.

    पुढे म्हणाला की, लोकं म्हणतात की भारत-पाकिस्तान सामन्याचं प्रचंड दडपण असतं. पण मला ते कधीच जाणवलं नाही. जेव्हा मी खेळत होतो, तेव्हाही मला ते जाणवलं नाही. जेव्हा पहिल्यांदा मी बंगाल क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झालो, तेव्हा २०१६च्या वर्ल्डकपमधला सामना इडन गार्डन्सवर झाला. एक आयोजक म्हणून तो माझा पहिला सामना होता, असं गांगुली म्हणाला.