या पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. सुहासने हे पदक एसएल-४ (SL4 final) प्रकारात जिंकले आहे.
टोकियो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympics)आज अखेरच्या दिवसाची सुरुवात ही आनंदायी झाली असून,भारताच्या सुहास यतीराजने(Suhas Yathiraj) बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकाची कमी केली आहे. मूळच्या नोएडाच्या डीएम सुहास यतीराज यांनी अंतिम सामन्यात फ्रेंच खेळाडू लुकास माजूरकडून(Lucas Mazur) पराभूत झाले.
Tokyo Paralympics: Noida DM Suhas Yathiraj bags silver after losing to Lucas Mazur in SL4 final
Read @ANI Story | https://t.co/0IRR6hHH1g#TokyoParalympics #SuhasYathiraj pic.twitter.com/HaGRRL7m1k
— ANI Digital (@ani_digital) September 5, 2021
अंतिम सामान तीन सेटपर्यंत चालला. यामध्ये सुहासने पहिला गेम २१-१५ ने जिंकला आणि त्यानंतर त्याने दोन्ही गेम एका कठीण सामन्यात गमावले. लुकास मजूरने शेवटचे दोन्ही गेम २१-१५, १७-२१ ने जिंकले. या पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. सुहासने हे पदक एसएल-४ (SL4 final) प्रकारात जिंकले आहे.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
A fantastic confluence of service and sports! @dmgbnagar Suhas Yathiraj has captured the imagination of our entire nation thanks to his exceptional sporting performance. Congratulations to him on winning the Silver medal in Badminton. Best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/bFM9707VhZ
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2021
पंतप्रधानांनी डीएम सुहासच्या विजयाचे वर्णन क्रीडा आणि प्रशासनाचे उत्तम संयोजन म्हणून केले. त्याने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, तू तुझ्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.
यूपीचे मुख्यमंत्री योगी नीही केले अभिनंदन
आज टोक्यो #Paralympics में @dmgbnagar सुहास एल. वाई. ने बैडमिंटन स्पर्धा में रजत पदक जीतकर भारतवर्ष की खेल प्रतिभा को वैश्विक पटल पर प्रतिष्ठित किया है।
समूचे देश को हर्षाने वाली यह अविस्मरणीय उपलब्धि अनेकानेक खिलाड़ियों को प्रेरित करेगी।
आपको अनन्त शुभकामनाएं।
जय हिंद!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 5, 2021
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुहासचे रौप्य जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की तुम्ही पदके जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. तुमचे हे यश देशातील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल.
२००७ मध्ये झाले ‘आयएएस’ अधिकारी
सुहासने बेंगलोरमध्ये खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. पण पुन्हा पुन्हा त्याच्या मनात खंत आहे की जर त्याने आपल्या आयुष्यात समाजासाठी काही केले नसेल तर काय उपयोग. २००७ मध्ये सुहास यूपी कॅडरमधून आयएएस अधिकारी झाले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आग्रा येथे तैनात होते. त्याची ड्युटी संपल्यानंतर सुहास वेळ काढून बॅडमिंटन खेळायला जायचा. हळूहळू तो व्यावसायिकपणे बॅडमिंटन खेळू लागले.