17 ऑक्टोबरपासून भारतात नव्हे तर युएईत खेळवली जाणार टी-20 विश्वचषक स्पर्धा ?

ही स्पर्धा जरी युएईमध्ये आयोजित केली जाणार असली, तरी याचे यजमानपद भारताला मिळू शकते. लवकरच आयसीसीला टी-20 विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये हलविण्याविषयी बीसीसीआय अधिकृतपणे माहिती देईल. युएईमध्ये विश्वचषक आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन केले गेले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

    नवी दिल्ली : 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. यापूर्वी भारतात ही स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित केले होते. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने स्पर्धेचे ठिकाण बदलले आहे.

    ही स्पर्धा जरी युएईमध्ये आयोजित केली जाणार असली, तरी याचे यजमानपद भारताला मिळू शकते. लवकरच आयसीसीला टी-20 विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये हलविण्याविषयी बीसीसीआय अधिकृतपणे माहिती देईल. युएईमध्ये विश्वचषक आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन केले गेले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

    विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो दौरा संपल्यावर लगेच टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामन्यांसाठी यूएईत दाखल होईल आणि आता आयपीएल २०२१ची फायनल होताच दोन दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( ICC T20 World Cup ) स्पर्धा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत आणि त्यानुसार भारतीय खेळाडूंसह आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या व राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या प्रत्येक खेळाडूची दमछाक होणार आहे.