
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटूने प्रेयसी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा केला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता. वर्षभरानंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते दोघे विवाह करणार आहेत. दोन्हीही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
मुंबई : भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्घ दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळत आहे. के एल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील वर्षी के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे लग्न बंधनात अडकण्यार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता भारतीय संघातील आणखीन एक स्टार खेळाडू शार्दूल ठाकूर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटू शार्दूल ठाकूरने प्रेयसी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा केला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता.वर्षभरानंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते दोघे विवाह करणार आहेत. दोन्हीही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाची तयारीला सुरुवात झाली आहे.
मित्ताली परुळकरने आपल्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, “लग्न सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये होणार असल्याची माहिती मित्तालीने दिली आहे. शार्दुल (Shardul Thakur) टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करतेय. शार्दुल लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमाला पोहोचणार आहे”.
पुढे मितालीने लग्न स्थळांविषयी बोलताना सांगितले की, आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील तिने शेवटी सांगितले आहे.
शार्दुलची (Mittali Parulkar) होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. तर शार्दुल ठाकूर हा मुळचा पालघरचा आहे. त्याने क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते.