corona

मुंबई : आज राज्यात(state) ५,९०२ नवीन कोरोना(corona) रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६,६६,६६८ झाली आहे. तर आज ७,८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १४,९४,८०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

मुंबई : आज राज्यात(state) ५,९०२ नवीन कोरोना (corona) रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६,६६,६६८ झाली आहे. तर आज ७,८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १४,९४,८०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण १,२७,६०३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६२% एवढा आहे. यात मंडळ निहाय मृत्यू संख्येत ठाणे मंडळ ५६, नाशिक मंडळ ०७, पुणे मंडळ ३९, कोल्हापूर मंडळ ९१, औरंगाबाद मंडळ ०७, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ०७, नागपूर १७ असे १५६ मृत्यू सांगण्यात आले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८,३७,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६६,६६८ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.