बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत(agricultural business and rural change project) अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत(agricultural business and rural change project) अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदत आज १५ डिसेंबरपर्यंत होती. त्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत १७५० अर्ज प्राप्त झालेले आहेत. या प्रकल्पातून सर्वसमावेशक व स्पर्धाक्षम मूल्यसाखळ्या विकसित करावयाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.