बिहारनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस, नारायण राणेंनी दिले संकेत

मुंबई: बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ(operation lotus in maharashtra) नक्की होणार, असा दावा नारायण राणे(narayan rane) यांनी केला आहे.

मुंबई: बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ(operation lotus in maharashtra) नक्की होणार, असा दावा नारायण राणे(narayan rane) यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक काही बोलण्यास राणे यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेन, असे नारायण राणे यांनी सांगितले  आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करताना उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  दरम्यान, याबाबत उत्तर देताना राणे यांनी १२ डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असे आव्हान नीलम गोऱ्हे यांनी दिले.