प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सोमवारच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सीमा भागात गस्त वाढवली आहे.अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.सीमेवरून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.एका निवेदनात, मोर्चाने म्हटले आहे की, एसकेएम प्रत्येक भारतीयांना या देशव्यापी चळवळीत सामील होण्याचे आणि 'भारत बंद' ला मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे आवाहन करते.

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी आज सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे. शांततेच्या मार्गाने पार पडणार आहे तरी सुरक्षितेतसाठी राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व ४० घटक संघटनांना त्यांचे कार्य थांबवण्यासाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ४ पर्यंत एकत्र येण्याचे आवाहन केले.

    सोमवारच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सीमा भागात गस्त वाढवली आहे.अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.सीमेवरून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.एका निवेदनात, मोर्चाने म्हटले आहे की, एसकेएम प्रत्येक भारतीयांना या देशव्यापी चळवळीत सामील होण्याचे आणि ‘भारत बंद’ ला मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे आवाहन करते. आम्ही कामगार,व्यापारी, वाहतूकदार,व्यापारी,विद्यार्थी,तरुण आणि महिला आणि सर्व सामाजिक चळवळींच्या संघटनांना आजच्या दिवशी शेतकऱ्यांसोबत एकता दाखवण्याचे आवाहन करतो.मोर्चाने सर्व राजकीय पक्ष आणि राज्य सरकारांना ‘भारत बंद’चे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.ते म्हणाले की हे त्यांचे धोरण आहे की राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एसकेएम व्यासपीठ सामायिक करणार नाहीत.

    यांचा पाठिंबा
    पंजाब आणि आंध्र प्रदेश सरकार आणि काँग्रेस-बसपा-सपासह अनेक पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा यांनी शनिवारी सांगितले की,त्यांचा पक्ष २७ सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आवाहनाचे जोरदार समर्थन करतो

    काय बंद काय सुरु

    हा बंद सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत राहील. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, मदत आणि बचाव कार्यांसह सर्व अत्यावश्यक सेवांना बंदमधून सूट देण्यात येईल. मोर्चा म्हणाला, बंद स्वैच्छिक आणि शांततापूर्ण पद्धतीने अंमलात आणला जाईल.मोर्चाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,बाजारांबरोबरच राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेवरील वाहतूकही बंद राहणार आहे. दिल्लीला येणाऱ्या महामार्गांसोबतच राष्ट्रीय राजधानीतून जाणारे केजीपी, केएमपी महामार्गही बंद केले जातील.