विद्युत उपकेंद्राच्या कामाला पुन्हा मिळणार चालना, वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण होणार कमी

कल्याण : सध्या तारापूर व पडघ्याहून येणाऱ्या वीज पुरवठ्याच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतून, वीजपुरवठा मानपाडा रोड येथील प्रीमियर ऑटोमोबाईल्स कंपनीतील स्विचिंग स्टेशनला होतो. त्यानंतर या स्विचिंग

कल्याण : सध्या तारापूर व पडघ्याहून येणाऱ्या वीज पुरवठ्याच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतून, वीजपुरवठा मानपाडा रोड येथील प्रीमियर ऑटोमोबाईल्स कंपनीतील स्विचिंग स्टेशनला होतो. त्यानंतर या स्विचिंग स्टेशनमधून कल्याण ग्रामीण विभातील काही भाग, सोनारपाडा व परीसर, डोंबिवलीपासून कल्याण पूर्व भागात त्याचे वितरण करण्यात येते.

तारापूर, पडघ्या पासून विद्युतपुरवठा वाहून नेणाऱ्या सदर वाहीन्यातून येणारा वीजपुरवठा प्रिमीयर ऑटोमोबाईल येथील स्विचिंग स्टेशनमध्ये होईपर्यंत अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या विभागात वीजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नानुसार मेट्रो मॉल येथे एक नवीन स्विचिंग स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार, हा मेट्रो मॉल येथील स्विचिंग स्टेशनपर्यंत भूमीगत केबल्स टाकण्याचे काम महाराष्ट्र वितरण कंपनीने कल्याण पूर्व येथील चक्की नाक्यापर्यंत पूर्ण केले होते. मात्र चक्कीनाका ते मेट्रोमॉल पर्यंत भूमीगत लाईन टाकण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून परवानगी या ना त्या कारणाने  देण्यात येत नव्हती.  ही बाब खासदार कार्यालया तर्फे  प्रफुल्ल देशमुख यांच्या या  कामाचा पाठपुरवठा करत असताना  निदर्शनास आली असता  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांकडे करून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे परवानगी मिळवून देण्यात यश मिळवले . दरम्यानच्या काळात कोरोना आजाराच्या थैमानामुळे यासाठी लागणारी सामुग्री मिळण्यास विलंब झाला होता पण तरीही या कठीण परीस्थीतही या  कामाचा पाठपुरावा खासदार कार्यालया तर्फे चालूच ठेवण्यात आला व त्याची परीणीती म्हणून या कामास आता चालना मिळाली आहे.
 त्यानुसार आता केबल्स, व सर्व आवश्यक सामुग्री महाराष्ट्र विद्युत महामंडळाकडून चक्कीनाका येथे आणण्यात यश आले असून हे काम २६ मे रोजी चालू करण्यात येणार असल्याचे खासदार कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे ज्याला विद्युत मंडळाकडून दुजोरा देण्यात आला असून या उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यावर विद्युत  पुरवठा  खंडीत होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.