
कोरोनाच्या काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का?
अंबरनाथ: ‘काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात. परंतु माझ्या आंदोलन करणार्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत. यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते,’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मधून एक फोन करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. प्रत्यक्षात मात्र फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. पण कृती काहीच करत नाहीत, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कॅबिनेट मंत्री @Awhadspeaks, ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार @paranjpe_anand प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते @maheshtapase पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/OC8NGje5XH
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2021
“कोरोनाच्या काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला