crime

आझादनगर (Azadnagar) येथील पीडित २१ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान यांच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिची नणंद हुस्नतारा ही शिवीगाळ करून मारझोड करीत होते.

भिवंडी : माहेरून गाडीसाठी पैशांचा तगादा लावून पैसे न मिळाल्याने पतीने-पत्नीला मोबाईलवरून तिहेरी ‘तलाक’ (Triple Talaq) देणाऱ्या पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पीडित पत्नीने गुन्हा (crime) दाखल केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. सुभान आजम खान ( रा. समरुबाग) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्यास शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आझादनगर (Azadnagar) येथील पीडित २१ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान यांच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिची नणंद हुस्नतारा ही शिवीगाळ करून मारझोड करीत होते. तर आरोपी पती सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्राससहन केल्यानंतर या पीडित महिलेने चार वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता.

परंतु तलाक देण्याआधी आरोपी सुभानने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये, असा पत्नीकडे तगादा लावला होता. ते न देऊ शकल्याने पीडित पत्नीला नणंद आणि पतीने बेदम मारहाण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. शिवाय २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमाराला तिच्या मोबाईलवर संपर्क करून तिला शिवीगाळ करीत मोबाईल वरूनच तिला तिहेरी तलाक देऊन तलाक झाल्याचं सांगितले , यांनतर पीडित पत्नीने न्यायाची अपेक्षा करत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ३२४, ५०४ प्रमाणे मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्या अंतर्गत कलम ४ नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस हवलदार आर.आर. चौधरी करीत आहेत.