संतोष पाटील, वाडा : आई आजारी असल्याने दिल्ली गाठायची आहे. मात्र राज्याच्या सीमा बंद आहेत आणि रोजगारही ठप्प झाला अशातच पैसे नाहीत आणि अत्यावश्यक सेवा वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद झालेली. अशा
संतोष पाटील, वाडा : आई आजारी असल्याने दिल्ली गाठायची आहे. मात्र राज्याच्या सीमा बंद आहेत आणि रोजगारही ठप्प झाला अशातच पैसे नाहीत आणि अत्यावश्यक सेवा वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद झालेली. अशा परिस्थितीत करावे काय या विवंचनेत असलेल्या नवी मुंबईतील आकाश नावाच्या तरुणाने गाव गाठण्याच्या इर्शेने चक्क सायकलने प्रवास सुरु केला. सायकलने प्रवास सुरु असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ त्याच्या सायकलचा टायर फुटला तरी न डगमगता त्याने फुटलेल्या टायरवरच चालतच भिवंडी -वाडा या मार्गावरील ४० ते ५० किमी अंतर कापले. एखादे दुकान मिळेल तर टायर बदलून घेईन अशी मनात खुण गाठ बांधत त्याने पालघर जिल्ह्यातील कुडुस गाव गाठले. तिशे त्याला माणुसकीचा झरा वाहत असल्याचा प्रत्यय आला.