शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण गेणश नाईक यांनी त्यांना धोका दिला असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते.
नवी मुंबई : शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण गेणश नाईक यांनी त्यांना धोका दिला असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते.
गणेश नाईकांवर टीका करताना आव्हाडांनी भाजपवरी जोरदार निशाणा साधला. गणेश नाईक यांनी ज्या प्रकारे शरद पवारांना धोका दिला तशाच प्रकारे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही विश्वासघात केला होता असा घणाघातही आव्हाडांनी केला.
काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण तेच तिकडे पळाले, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे. असे झाल्यास आपले शेतकरी कुठे जातील? ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठे केले त्याच सहकार क्षेत्रात भाजपने घोळ घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.