torent

भिवंडी: टोरेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे,

 भिवंडी: टोरेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हापरिषद सदस्य कुंदन पाटील, ग्राहक प्रतिनिधी म्हणून महेंद्र कुंभारे, विष्णू करंडे, शरद पाटील उपस्थित होते. तसेच प्रांताधिकारी नळदकर, महावितरणचे बुलबुले, टोरेंट कंपनीकडुन कुलकर्णी, देशमुख, बदयानी वगैरे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत टोरेंट कंपनीच्या मे महिन्याच्या जादा बिलावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार शांताराम मोरे आणि कुंदन पाटील यांनाही टोरेंट कंपनीने अव्वाच्या सव्वा बिले पाठविली तर आदिवासींना आलेली बिले समोर ठेवली. ज्यांना खायला एकवेळचे अन्न नाही त्यांनाही ८ ते ९ हजार रूपये बिल आले आहे. विशेष म्हणजे रिडिंग मात्र शून्य आहे. यावर टोरेंट अधिकाऱ्यांनी चौकशी करावी लागेल  जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच त्यांना सांगितले. तर मे महिन्याच्या जादा बिलाबाबतचा तांत्रिक मुद्दा महेंद्र कुंभारे यांनी मांडला  भिवंडी शहरात कारखाने, दुकाने, घरे यांना एकाच ट्रान्सफार्मरवरुन पाॅवर दिली गेली आहे. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात कारखाने आणि दुकाने बंद असल्यामुळे आणि कंट्रोल पॅनल नसल्यामुळे ग्राहकांचे मिटिर रिडिंग फास्ट फिरुन खुप जादा रिडिंग आले आहे. हा टोरेंट कंपनीचा दोष आहे. यामध्ये टोरेंट कंपनीचा खुप मोठा आर्थिक फायदा होणार आहे. महावितरण महाराष्ट्रात मीटर रिडिंग घेऊन ग्राहकांना विज बिल देत नाहीत तोपर्यंत भिवंडीतील ग्राहकांच्या वीज बिलाला स्थगिती देण्याची मागणी महेंद्र कुंभारे यांनी केले. तसेच महावितरणने ग्राहकांना दिलेल्या रिडिंगची आणि टोरेंट कंपनीने ग्राहकांना दिलेल्या रिडिंगची तुलना करुन मगच या वाढीव बिलाचा मुद्दा निकाली काढावा असेही कुंभारे यांनी सांगितले त्यानंतर अनेक प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले त्याचे त्यांना उत्तर देताना आले नाही. जोपर्यंत ग्राहकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.