kalyan grampanchayat election

कल्याण(kalyan) तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक(grampanchayat election) पार पडली असून या निवडणुकीचा निकालदेखील आज जाहीर झाला आहे. मात्र या ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी आपआपले सरपंच होणार असल्याचे दावे ठोकल्याने सरपंच निवडीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

कल्याण : कल्याण(kalyan) तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक(grampanchayat election) पार पडली असून या निवडणुकीचा निकालदेखील आज जाहीर झाला आहे. मात्र या ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी आपआपले सरपंच होणार असल्याचे दावे ठोकल्याने सरपंच निवडीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या २११ जागा असून यामध्ये ११ सदस्य संख्या असलेली वरप ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती. तसेच इतर ग्रामपंचायतींमध्ये काही सदस्य देखील बिनविरोध आल्याने २११ पैकी ३३ जागांवर बिनविरोध सदस्य निवडून आले होते. यामुळे १६७ जागांसाठी मतदान पार पडले. या मतदानाचा कौल पहाता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणाची सरशी झाली आहे तर कोणाला धक्का बसला आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गाव पातळीवर पॅनल पद्धतीने निवडणुका लढविल्या जातात. गावाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक पातळीवर या पॅनलला राजकीय पक्षांचे छुपे पाठबळ असते.

बेहरे ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे राखण्यात यश आले असून दुसरी ग्रामपंचायत म्हारळ त्रिशंकू अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत मनसेनेदेखील आपले खाते उघडले आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली, म्हसकळ, निंबवली, गुरवली, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री, नडगाव, सांगोडा या ग्रामपंचायतीवर भाजपा दावा करत असून खडवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना काँग्रेस आघाडीने सत्ता मिळवली आहे. तर म्हारळ ग्रामपंचायत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. येथे भाजपा ७, शिवसेना ७व इतर ३असे पक्षीय बलाबल आहे.

औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांबा ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. याच प्रमाणे वडवली, रायते, मानवली, येथे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे. येथे मनसेचे ४,भाजपा २,आणि शिवसेना ५असे पक्षीय बलाबल आहे. तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. असे असले तरी सरपंच पदाची निवड झाल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात राहतात हे चित्र स्पष्ट होईल.