भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील गावांतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके बाधित आढळून येत आहेत, तर मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटत असून, काही दिवसांच्या अंतराने एखाद्दुसरे मृत्यू होत आहेत.
ठाणे : ठाणे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. ठाण्यातील पाचही तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. तर, येथील १८४ ग्रामपंचायती कोरोनापासून अलिप्त आहेत.
भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील गावांतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके बाधित आढळून येत आहेत, तर मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटत असून, काही दिवसांच्या अंतराने एखाद्दुसरे मृत्यू होत आहेत.
३१ मार्च २०२० रोजी ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीपर्यंत दोन लाख ४८ हजार ८०९ रुग्ण बाधित झाल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक शहरांमध्ये दोन लाख २९ हजार ८३१ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात पाच हजार ४६४ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर गावपाड्यांमध्ये केवळ ५८३ जण दगावलेले आहेत.