wardha river

  • लवकरच कठडे बसण्याची होत आहे मागणी

इंझाळा. देवळी तालुक्यातील तांबा येथील वर्धा नदीवरील पुलाचे कठडे नुकत्याच आलेल्या पुरामुळे वाहून गेले. त्यामुळे तुटलेल्या कठडयांची दुरस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
पुराचे पाणी जास्त आल्याने पुलावरून सुद्धा पुराचे पाणी वाहत होते. पाण्याचे प्रवाहाने कठडे वाहून गेले. काही व ठिकाणी तुटलेले आहे. कठडे नसलेल्या पुलावरून अवागमन करताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर कठाडे दुरुस्ती करावी. वाहतूक निर्भीडपणे करता यावी. या प्रतिक्षेत नागरिक आहेत. प्रशासनाकडे याकडे लवकर लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.