प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मंगरुळपीर (जि.वाशिम)(Mangrulpir). धरणाच्या सांडव्यात चार जण वाहून गेल्याची घटना तालुक्यातील मोतसावंगा धरणावर २२ सप्टेंबर रोजी घडली. मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे (वय ६५), दिलीप वाघमारे (वय ३५), गोपाल जामकर (वय ३०) व महादेव इंगळे (वय ३०) सर्व रा. मोतसावंगा हे शेतात गेले होते;

परंतु घरी येत असतांना तेथील धरणातील सांडव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहत होते. या सांडव्यात वरील चारही जण वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहेपर्यंत वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरु होते.