www.navarashtra.com

Published March 21,  2025

By  Prajakta Pradhan

चैत्र नवरात्रीत यावेळी करु नका कलश स्थापना

Pic Credit - iStock

सनातन धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. चैत्रामध्ये कसश स्थापना कधी करायची, जाणून घ्या

चैत्र नवरात्री 2025

पंचागानुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात 30 मार्च रोजी होईल. याची समाप्ती 7 मार्च रोजी होईल. यावेळी देवी दुर्गेची पूजा केल्याने संकटे दूर होतात. 

चैत्र नवरात्र सुरुवात

अमावस्या तिथीला कलश बसवणे टाळावे. असे केल्याने माता दुर्गा रागावू शकतात आणि पूजेचे फळ मिळणार नाही.

कलश स्थापना

तुम्ही रात्री कलशाची स्थापना केली तर तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेहमी शुभ मुहूर्तावर कलश स्थापना करा

रात्री करु नका

कलश स्थापनेसाठी 30 मार्च रोजी सकाळी 6.13 पासून 10.22 पर्यंत शुभ मुहूर्त राहील. या शुभ काळात घटस्थापना केल्याने शुभ फल प्राप्त होते.

कलश स्थापना मुहूर्त

30 मार्च रोजी 12.01 पासून दुपारी 12.50 पर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर कलश स्थापना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

अभिजीत मुहूर्त

यावेळी ओम आ जिघ्र कलश मह्या त्वा विशन्त्विन्दव: या मंत्राचा जप करावा. याची उपासना केल्याने शुभ फळ मिळते आणि प्रगतीची शक्यता असते.

 मंत्र

चैत्र नवरात्रीमध्ये पूजा करताना दुर्गादेवीला लाल चुनरी आणि श्रृंगाराचे सामान अर्पण करावे. याशिवाय हिबिस्कसचे फूल अर्पण केल्याने मातेचा आशीर्वाद मिळतो.

वस्तू अर्पण करा

एसिडीमुळे त्रास होतो, डाएटमध्ये करा बदल