आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जाते. यंदा दीप अमावस्या बुधवार, 12 ऑगस्ट रोजी आहे
Picture Credit: Pinterest
कणकेचे दिवे बनवण्याची परंपरा ही अन्न, समृद्धी, कृतज्ञता आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि पितरांचे व सूक्ष्म जीवांचे स्मरण करून त्यांना अन्न व प्रकाशाचा भाग अर्पण केला जातो.
Picture Credit: Pinterest
कणिक (गव्हाचे पीठ) हे अन्नपूर्णेचे रूप मानले जाते. पिठाचे दिवे बनवून ते प्रज्वलित करणे म्हणजे घरात अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना करणे होय.
Picture Credit: Pinterest
या दिवशी कणकेचे गोड दिवे बनवून त्यात साजूक तूप घातले जाते. असा सात्विक नैवेद्य दाखवल्याने पितर आणि इतर सूक्ष्म जीव-जिवाणू तृप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Picture Credit: Pinterest
अनेक ठिकाणी कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांना ओवाळले (औक्षण) जाते. यामुळे मुलांना दीर्घायुष्य लाभते, आरोग्य उत्तम राहते आणि वाईट दृष्ट लागण्यापासून रक्षण होते असे मानले जाते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
दिव्याचा प्रकाश आणि कणकेची पवित्रता मिळून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता, सुख-शांती नांदते.
Picture Credit: Pinterest
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या आषाढ अमावस्येला 'दीप अमावस्या' किंवा 'दीपपूजन' म्हटले जाते. हिंदू संस्कृतीतील अत्यंत सण-उत्सवांचा व व्रतवैकल्यांचा 'श्रावण' महिना सुरू होतो, ज्याचे स्वागत दिव्यांच्या प्रकाशाने केले जाते.