शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळे खाणं गरजेचे आहे. तुम्ही ते कसे खाता यावर देखील अवलंबून आहे. चुकीच्या पद्धतीन फळ खाणे शरीराला हानिकारक हसू शकते
जर तुम्ही रिकाम्या पोटी फळ खाल्ल्यास तुम्हाला काय नुकसान होते. जाणून घ्या रिकाम्या पोटी फळ खाल्ल्याने काय तोटे होतात
फळांमध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन ई, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, आयरन, फायबर यांसारखे प्रथिने त्यामध्ये असतात.
जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी संत्री, द्राक्ष आणि अननस सारखे फळ खाल्ले तर ॲसिडीटीची समस्या जाणवते. कारण या आंबट फळांमध्ये सिट्रिक ॲसिड असते. ही फळे काही खाल्ल्यानंतर 1-2 तासाने खावी
मधुमेहाच्या रुग्णांनी केळ आणि चिकू ही फळ खाण्यापासून वाचावे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह वाढण्याची समस्या जाणवते.
ज्या लोकांना फायबरची अॅलर्जी आहे त्या लोकांनी रिकाम्या पोटानी फळ खावू नये. या लोकांना पोट फुगणे, गॅस किंवा पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला या सर्व समस्यांपासून वाचायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी फळ खावू नका. काही खाल्ल्यानंतर 1 ते 2 तासानंतर फळ खाणे चांगले आहे.
तुम्ही फळ खाताना या गोष्टीकडे लक्ष द्या की ते जास्त प्रमाणात खावू नये नाहीतर तुमचे आरोग्य बिघडू शकते