पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘ही’ फळं आहेत एकदम बेस्ट

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही फळांचं सेवन उपयुक्त ठरतं.या फळांविषयी आपण जाणून घेऊयात.

 सफरचंदामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

सफरचंदातल्या गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन शक्ती सुधारते.

 नाशपती अर्थात Pears मध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं.

 त्यामुळे   नाशपती खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

डाळिंबात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असल्याने हे शरीरासाठी उपयुक्त आहे.

संत्र्यामध्येही व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने पचनशक्ती सुधारते.

केळ्यामधल्या पोटॅशियममुळे इलोक्ट्रोलाइट्सचं संतुलन होण्यास मदत होते.

 पपईदेखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.