Published Jan 6, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
माणूस खाण्या-पिण्याशिवाय किती दिवस जगू शकतो, हा प्रश्न नेहमीत आपल्या मनात येतो.
साधारणपणे 3 चा नियम खाण्याच्या सवयींबाबत विचारात घेतला जातो.
माणूस हवेशिवाय (ऑक्सिजन) तीन मिनिटे, पाण्याशिवाय तीन दिवस आणि अन्नाशिवाय तीन आठवडे जगू शकतो.
हा नियम प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा देखील असू शकतो.
हा नियम व्यक्तींच्या जीवनशैलीवर, प्रतिकारशक्तीवर आणि हवामानावर अवलंबून असतो.
निरोगी मनुष्य अन्नाशिवाय आठ आठवडे जगू शकतो, असा डॉक्टरांचा दावा आहे.
पण अन्नाशिवाय जगताना माणसाला पाण्याची गरज असते.
आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. जी आपल्याला अन्न आणि पाण्यापासून मिळते.
आपले शरीर अंदाजे 60 ते 70 टक्के पाण्याने बनलेले असते.
पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर पेशी जिवंत ठेवण्यासोबत शरीराचे तापमानही नियंत्रित करते.
साधारणपणे एखादा आठवडाभर पाण्याशिवाय जगू शकतो, परंतु तापमान जास्त असल्यास ही वेळ कमी असू शकते.
एका संशोधनानुसार, सरासरी तापमानात माणूस पाण्याशिवाय 100 तास जगू शकतो.
जास्त वेळ पाणी न पिल्याने डिहायड्रेशनचा धोका असतो.