मुलांना भावनिकदृष्ट्या खंबीर बनवणे खूप गरजेचे आहे.

भावनिकदृष्ट्या खचलेली, घाबरलेली मुलं सहजपणे गुंडांचे बळी ठरू शकतात.

त्यांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी, त्याचे ऐकणे सुरू करा आणि प्रेमाने वागा.

त्याला टोमणे मारून गप्प बसवण्यापेक्षा त्याच्या समस्या ऐकून घेणे चांगलं आहे.

त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा.

प्रत्येक गोष्टीत त्यांना मर्यादा घालू नका, त्यांना चुका करण्याचेही स्वातंत्र्य द्या.

तुमच्या मुलांना वेळ द्या, त्यांच्याशी खूप गप्पा मारा.

अशा प्रकारे त्याला समस्यांशी लढण्याचे धैर्य मिळेल.