लोक जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील 'हा' किल्ला पाहतातच, जाणून घ्या

हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरीपासून ४८ किमी अंतरावर आहे.

डोंगराच्या पायथ्यापासून पाहिल्यावर हा किल्ला चौकोनी आकाराचा दिसतो, पण या किल्ल्याची रचना प्रिझमसारखी आहे.

याची संरचना दोन्ही बाजूंनी 90 अंशांच्या सरळ रेषेत आहे, किल्ला सुमारे 170 मीटर लांबीच्या डोंगरावर बांधला आहे.

गडावर चढण्यासाठी सुमारे 177 पायऱ्या आहेत. 50 पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा मुख्य दरवाजा लागतो.

गडावर चढण्यासाठी पायऱ्या इतक्या सरळ आहेत की चढताना लोकांची अवस्था बिकट होते, परंतु तरीही लोक येथे प्रामुख्याने चढाई करण्यासाठीच येतात.

हरिहर गडाच्या माथ्यावर हा जलकुंभ आहे, ट्रेकिंग करतच या किल्ल्यावर जाता येते.

उपलब्ध अहवालानुसार, किल्ल्याची पायाभरणी यादव घराण्याने ९व्या ते १४व्या शतकात केली होती.

हा हरिहर किल्ल्याचा गुप्त दरवाजा म्हणजेच चोर दरवाजा आहे, इथून वरच्या बाजूला एक हनुमान मंदिर, एक तलाव, काही पाण्याच्या टाक्या, महालाचे अवशेष आणि विशाल हरिहर किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूवर ध्वज दिसतो.

किल्ल्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाटमार्गे व्यापारी मार्ग पाहण्यासाठी बांधण्यात आला होता.

हे सुंदर दृश्य हरिहर किल्ल्याच्या माथ्यावरून पाहता येते.

हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.