दिवाळीत मातीच्याच पणत्या लावण्यामागे काय आहेत कारणे?

दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण आहे.

सर्वत्र उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

दिवाळी आणि दिव्यांचं अनोखं नातं आहे.

दिवाळीत मातीचेच दिवे/पणत्या लावण्यामागे काय कारणे आहेत ते जाणून घेऊयात.

प्रभू रामचंद्र जेव्हा चौदा वर्षांनंतर अयोध्येत आले तेव्हा मातीच्या पणत्या लावून आणि रांगोळ्या काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं, असं म्हटलं जातं. तेव्हापासून ही दिवे लावण्याची पद्धत सुरु झाली.

कार्तिक महिन्यातील अमावस्येपासून दिवाळी संपेपर्यंत मातीच्या पणत्या लावल्या जातात.

दिव्यामुळे ग्रहदोष दूर होतात, असं म्हटलं जातं. त्यामुळेही हे दिवे लावले जातात.

 मातीची भांडी, वस्तू बनवणाऱ्यांना व्यापारातून पैसे मिळावे आणि त्यांचा सण चांगला साजरा व्हावा म्हणून त्यांच्याकडून मातीच्या पणत्या दरवर्षी खरेदी केल्या जातात.

सध्या मातीच्या दिव्यांचं महत्त्व कमी झालं आहे पण ही परंपरा जपणं आपली जबाबदारी आहे.